शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

शक्यता (अशीही आणि तशीही !)

                                     प्रकरण २

                       सरिताच्या वाक्यांनी मी सहा वर्षे मागे गेलो.आमचा S.E.चा वर्ग त्यात चित्रे सरांचा गणिताचा तास.चित्रे सरांना १० मितींवरून खूप पिळले होते आम्ही!"सर तीन मिती दिसतात.चौथी मिती काळ! पण पाचवी ते दहावी मिती कळात नाही! सर, आकृती काढून समजावून सांगा ना" आमच्यामुळे इतरांनाही जणू स्फुरण चढलं होते."आम्हाला समजावून द्यायचच असं चित्रे सरांनीही मनावर घेतला असावं कारण तब्बल दीड तास ते दहा मितांवर बोलत राहिले. आम्ही त्यांना पिळल कि त्यांनी आम्हाला कोण जाने पण मजा आली! नंतर कित्येक दिवस आम्ही एकमेकांना चिडवायचो ,"काय कोणत्या मितीत हिंडत आहात सध्या!" किंवा "ए  त्रास  नका  देऊ  रे... नाहीतर  मंडळी ४थ्या मितीतून ५ व्या मितीत पोहोचतील वगैरे..वगैरे..
                      नंतर बाकीचांच्या  डोक्यातून ती कल्पना हद्दपार झाली पण माझ्या आणि सरिताच्या डोक्यात मात्र ती ठाण मांडून बसली होती.आम्ही  त्यावरची मिळतील तेव्हढी पुस्तके,पेपर्स, माहिती वाचली. इतकेच नव्हे  तर आमचे  दोन्ही प्रोजेक्ट्स पण याच विषयावर होते!आत्ताही आमचे संशोधन अशाच काही प्रकारचे होते.मितीतील समांतर जगात जाण्याची पोर्टल्स शोधायचे काम सरिता करत होती तर त्यांची गणिती संभावना मी शोधत होतो.थोडक्यात सरिता नेहमीप्रमाणे PRACTICAL होती तर मी तत्त्वज्ञांनी!
                   मी भावनातिरेकाने तिचे हात धरले ,"सरिता अगं, कसलं जबरदस्त संशोधन आहे गं!मी क्षणात ६ वर्ष मागे जाऊन IIT त पोचलो!! मला गदागदा हलवून तिने माझ्या स्वप्नारांजानातून मला जागं केलं
"राहुल..कधीतरी चेष्टा करणं सोडून गंभीर हो!" इतका वेळ शांतपणाच्या  मुखवट्याखाली  दडलेलं  तिचं  टेन्शन मला आता जाणवलं! "OK! मग आता तू  सांग.तुझं संशोधन पूर्ण झालं ? मला  न  सांगता  अचानक  अशी का आणि कुठे गेली होतीस?" "मला तुला जे काही सांगायचं आणि दाखवायचं आहे त्यासाठी मला तुझे ३ ते ४ दिवस हवेत!" थोडक्यात   म्हणजे  मी  फक्त  योग्य  वेळेची  वाट  पहायची.... त्या  आधी  मादाम काहीही  सांगणार नाहीत आणि आता बाकी सर्व विचार सोडून मला प्लानिंग  करायला  हवे. आता  ती म्हणते तसं  तिला आणि मलाही तीन चार दिवसांसाठी गायब व्हायचं असेल तर त्याला प्लानिंग नको?
            तास दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मला हव तसं 'फुल प्रूफ' प्लानिंग  झालं. माझे व सरिताचे  पालक  मुंबईला स्थायिक होते. परंतु  तिच्या गायब होण्याच्या प्रकाराने तिचे बाबा बंगलोरला आले होते.  कोणालाही  काहीही उलगडून सांगायला वा विश्वासात घ्यायला सरिता तयार  नव्हती. त्यामुळे  सरिताच्या  गायब होण्यामागे तिचे आणि माझे संशोधनातील वाद कारणीभूत ठरले . आता ते संशोधन पूर्ण करण्यासाठी आम्ही काही दिवस बाहेरगावी जातो आहोत या आमच्या सांगण्यावर त्यांना विश्वास  ठेवावाच लागला.एकदा पोलिसांच्या समोर हजेरी लावल्यावर बाकीची कायदेशीर कारवाई सुद्धा सरिताच्या बाबांवर येऊन पडली.
         LAB मध्ये माझ्या बाबांना हृदयविकाराने आजारी पडावे लागले. रजेचे  काम  तर  झाले... अगदी  परतायला उशीर झाला तरी चालून जाईल इतके बेमालूम झाले.नाही म्हणायला काही जवळच्या मित्रांच्या  नजरांनी खुणावलं पण या बाबतीत सरीतासमोर आपली पुरी शरणागती होती! त्यानाही योग्य वेळ येई  पर्यंत थांबावे लागणार होते. सर्व काही मी व सरीतानी एकमतानी केलं पण माझ्या एका प्रश्नाबाबत  मात्र आमचे एकमत नव्हते. कुठे   काही  CALCULATION  चुकले आणि परत येणे लांबले अथवा परत  येणे जमलेच नाही तर? या माझ्या प्रश्नांवर "आपण चार दिवसात परत येऊ" हे पालुपद तिने चालूच  ठेवले.
तिला ह्या प्रयोगाबद्दल सॉलिड विश्वास होता कि ती माझ्यापासून काही लपवत होती? पण काय? आणि का?  

शक्यता (अशीही आणि तशीही !)

                                    प्रकरण १


           गुरूवारी सकाळी सात साडे सातची वेळ . मी मस्त साखर झोपेत होतो. तीन  दिवसांच्या  ताणामुळे आणि जागरणामुळे उठायचा  अजीबात 'मूड' नव्हता . आणि ... दारावरची बेल वाजली. मी नेहेमी प्रमाणे दुर्लक्ष्य केले. पण माझी हि आळशी पणाची सवय माहिती असल्यासारखी १० सेकंदात ती परत वाजली.चडफडत मी दार उघडायला उठलोच. खरतर नेहमी बेल वाजवणारा जाण्याची वाट बघणारा मी तिसऱ्यांदा बेल  वाजायच्या  आत  दारापाशी  पोहोचलो सुद्धा ! बाहेरची व्यक्ती मला भेटल्याशिवाय जाणार नाही हि अन्तःप्रेरणा बहुधा मला आधीच झाली होती!
           पण एव्हढा मोठा धक्का मी अपेक्षिला नव्हता! दारात ती उभी होती!मी दर परत बंद केले ... ती? मी स्वप्नात तर नाही न? परत एकदा बेल वाजली . दर उघडले तर दारात खरच तीच होती! सरिता !! मी मलाच एका चिमटा काढला ; आणि कळवळून ओरडलो ,"सरिता तू? "
            "शू.." तिन मला गप्पा करत आत ढकललं आणि स्वतः आत येऊन दर लावलं. तिला पाहताच बधीर झालेल्या माझ्या डोक्यानं आता काम सुरु केल होतं. तिला विचारायचे साधारण ४२० प्रश्न माझ्या मनात तयार होत होते पण तोंडाने  असहकार पुकारला होता. त्याने वसलेला 'आ' बंदच होत नव्हता.
           "राहुल, अरे ओरडतोस काय? 'आ' काय वासतोस ? भूत पाहिल्यासारखं? मी सरिता आहे!" बस.. हीच सरिताची खासियत आहे! कुठल्याही प्रसंगात एकदम 'कूल' असते ही! तीन  दिवसांपूर्वी  बेपत्ता  होऊन  या बाईने एव्हढा गोंधळ  घातला  आहे  हे  हिच्या  या  शांत  उद्गारांवरून  लक्षात  तरी  येईल  का!  "O.M.G.S."एव्हढंच बोलू शकलो मी! "ए आळश्या, एवढी तीन दिवसांनी भेटतेय,किमान आत्ता तरी 'OH MY GOD SARITA!' हे वाक्य तरी पूर्ण बोल की! हं? " या सारीतासमोर काय बोलावं हेच मला सुचेना!
          "कुठे होतात मादाम तुम्ही इतके दिवस?" अस्मादिकांना हळूहळू वाचा फुटू लागली."सगळ्यात आधी गरमा गरम चहा पाज,मग बोलू... एकटाच घरात आहेस न?अर्थात तशीच वेळ साधून आलेय मी!" अजूनही बधीरावस्थेत असल्यामुळे यंत्रवत चालत मी स्वयंपाक घरात पोहोचलो.पाठोपाठ सरिता आलीच. ते बरंच झालं म्हणा, कारण स्वयंपाकघरात कोणती वस्तू कोठे सापडते आणि त्याचे पुढे काय करायचे असते याची अस्मादिकांना बिलकुल कल्पना नव्हती! सरिता मला माझ्यापेक्षा जास्त ओळखत असल्याने एव्हाना ती चहा करण्याच्या खटपटीला लागली होती. मी मात्र अजूनही  मुखास्तम्भासारखा उभा होतो! या  समोरच्या  व्यक्तीला आपण  पूर्णत्वाने ओळखतो असा माझा गैरसमज  होता.जो या 'सरिता' नामक 'रसायनाने ' अगदी चटके देऊन दूर केला होता!
            मी आणि सरिता ११ वी पासून एकाच GROUP मधे. मी ,सरिता, अव्या, रवी आणि चित्रा ! आमचा पाच जणांचा GROUP. अति हुशारआणि  अतिदंगेखोर असा आमचा लौकिक! कायम काहीतरी नवीन कड्या करायचो आम्ही पाच जणं . त्यावेळी आमचं एकच तत्त्व होतं -अभ्यास परीक्षेच्या आधी फक्त महिनाभर...बाकी सर्व वेळ FULL TO धमाल ! वेगवेगळ्या स्पर्धा , प्रोजेक्ट्स ...भलभलत्या विषयावर वाद- विवाद, चर्चा आणि बराच काही! वर्गात  प्रोफेसर्सना   त्रास  देण्यात आमचा पहिला नंबर! आम्ही तासाला बंक मारला कीच प्रोफेसर आमच्यावर खुश असायचे.
          शास्त्रज्ञ व्हायचं हे आमचं अगदी १२ वी पासून ठरलेलं .त्यामुळे IIT तून M .TECH  होईपर्यंत आम्ही एकत्र होतो! त्यानंतर मात्र आमच्या वाटा बदलल्या.मी आणि सरिता 'JUNIOR SCIENTITS' म्हणून IISE बंगलोरला आलो तर इतर तिघे आपापल्या वाटांनी अमेरिकेत गेले. पण तब्बल ९ वर्षे एकत्र राहूनही'ह्या सरिताला मी ओळखत नव्हतो!
           "अरे चहा घेना!"  बहुधा हे वाक्य सरिता तिसऱ्यांदा म्हणत होती. मी पट्कन तिच्या हातातून चहा घेतला. रागावून एकदम नाहीशी झाली तर मिळणारा चहाही जायचा! "मी  कुठेही गायब होत नाही. आणि झालेच गायब तरी तुझा हा आयता  मिळणारा चहा कुठेही घेऊन जात नाही!"
मनातले विचार काळात असल्यासारखे ती बोलली. मी संशयाने तिच्याकडे पहिले. "काय यार राहुल, तुझ्या  मनातले 'हे'  विचार कळायला मला कुठल्याही मशीन व सिद्धी ची आवश्यकता का भासेल? तब्बल ९ वर्ष  ओळखते तुला मी!" "पण मी मात्र तुला बिलकुल ओळखत नाही. कुठे गायब झाली होतीस तेही तब्बल  तीन दिवस?" मी म्हणालो."ओळख! तुला तर ओळखता आलच पाहिजे! रवी,अव्या,चित्रा सगळ्यांनी ओळखलं!" कपातून चहाचा घोट घेत सरिता बोलली.
             "तू रवी,अव्या आणि चित्राला भेटून आलीस?" मी अवाक! मनात  हिशोब करतोय..... इथून  अमेरिकेला जायला २ दिवस, तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी! प्रत्येकात साधारण ८०० ते २००० मैलांचं  अंतर..... १/१ दिवस प्रत्येकाला भेटायला धरला आणि परत यायचे २ दिवस... मग  तीनच  दिवसात  एव्हढा प्रवास कसा काय केलान हिने? विमान कार या नेहमीच्या वाहनांनी शक्यच नाही..शिवाय व्हिसाचं काय?आणि हिला तिकडेच जायचं होतं तर  सर्वाना सांगून का नाही गेली? इतका गोंधळ घालायची काय आवश्यकता होती?हि गायब झाल्याचं मी रवी,अव्या,चित्रा तिघांनाही बोललो होतो की! ते  तिघेही  साले  बोलले नाहीत हि भेटून गेल्याचं! नाही काहीतरी लोचा आहे.. काय? काय? माझी  हि घालमेल बघत  सरिता  शांतपणान समोर उभी! "काय?पेटतेय का काही टयूब लाईट? "
              TIME TRAVEL? MATTER ENERGY CONVERSION? STAR TREK सारखं ...ZAAAAP !पण मला न कळता? शक्य नाही... मग? मी वाईल्ड गेसेस करतोय...मग? "मग? DIMENSIONS.... मिती!माणूस वेगवेगळ्या मितीत प्रवास करू शकतो....विसरलास?" सरिताचा प्रश्न ऐकून मी  भानावर  आलो.. इतका वेळ मी जोरात बोलत होतो कि मनातल्या मनात याचीही शुद्ध मला राहिली नव्हती आणि तिच्या प्रश्नाने  तर ती पूर्णच हरपली!